Maharashtra Rain Update: मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने कहर केला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे नद्यांना पूर आले आहेत. या पुरामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पीक पाण्यात वाहून गेली आहेत. तर अनेक लोकांची घर देखील या महापुरात वाहून गेली आहेत. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. राज्यात अनेक नद्यांना पूर आले असून शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रात परतीच्या प्रवासाने धमाकूळ घातलेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीवर ची पुल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आशातच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे. मुंबई ठाणे या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update
यासोबतच आज जालना मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड पालघर या भागात रात्रभर पाऊस सुरू होता. पूर्ण दिवस ढळला मात्र सूर्य देवाचे दर्शन झाले नाही. राज्यातील या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. अति महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गाव गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे. नदीकाठच्या लोकांनी देखील सुरक्षित ठिकाणी पोहोचावे.
पुण्यात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्याच्या गाठमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यास आला आहे. मुठा नदीपात्राच्या शेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पुढील 24 तासात राज्यातील इतर भागात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हे पण वाचा| 1 ऑक्टोबर पासून लागू होणार हे 4 नवीन नियम! रेल्वे तिकीट, पेंशन, UPI व गॅस सिलिंडरच्या किमतीत होणार बदल
रेड अलर्ट मुळे कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेchi यंत्रणा रात्रीपासून ऑन अलर्ट वर आहे. मुसळधार पावसाचा धोका त्याचबरोबर भरतीच्या वेळी सकल भागात पाणी साचण्याची शक्यता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा 24 तास सज्ज आहे. रात्रीपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची भुरभुर सुरूच आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा; KDMC कडून नागरिकांना आवाहन केले जात आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अति मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला आहे. पाटनादेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगम स्थानावर मुसळधार पाऊस सुरू आहे. चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या डोंगरी व तितुर नदींनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील डोंगरी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तेरणा नदीच्या कडेला शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी लघु मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे असणारा जुई मध्यम प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाला असून मोठ्या प्रमाणात उसळून वाहत आहे.
अक्कलकोट तालुक्यामध्ये काल रात्री झालेल्या पावसामुळे अक्कलकोट ते वाघदरी रस्ता बंद करण्यात आला आहे. शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट वागदरी वाहतूक बंद झाली आहे. संपूर्ण राज्यात पावसाच्या या तांडवामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करेल अशी अपेक्षा आहे. अशा बिकट परिस्थितीत सर्वांनी एकमेकाला मदत करून बाहेर पडणे आवश्यक आहे.
